संततधार विधी म्हणजे काय ?

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (१२)

संततधार विधी म्हणजे काय ?

असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.

त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद्दोनच होतात.

To book your puja visit our website.

देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.

श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.

संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.

।।श्रीगुरूदेवदत्तार्पणमस्तु।।

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान,
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.

Source: Unknown Author

गिरनार म्हणजेच गिरी नारायण!

दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते.
१०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहतो. पहिल्यांदा जाणारे भाविक “नंतर मी परत येणार नाही हो” असेच म्हणताना दिसतात. 😊
पण गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. मग दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात.

जर आपण गुजरात प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केला तर बहुतांश प्रदेश हा सपाट आणि मैदानी आढळून येतो, मग जुनागढ लागले की गिरनारची भव्यता खरोखरच लक्ष वेधून घेते.
बाकीचा सर्व प्रदेश मैदानी म्हणल्यावर मधेच एवढा मोठा पर्वत आला कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच.
हे काम नक्कीच नैसर्गिक नाही तर एक दैवी रहस्य आहे हे जाणकार ओळखून आहेत.

To book your puja visit our website. 🙏🏻😌

गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासेल, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध आहे. म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे.

थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, असे मला वाटते.
पहिल्या ७५०० पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो.
खरे आहे कारण आपले कर्मबंध, इच्छा आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात, आता मूलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो?

मग मनोधैर्य वाढविण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, त्याशिवाय तरणोपाय नाही 😊.

अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गिर्यारोकांनासुद्धा ५०० पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. आहे का नाही मजेदार अनुभूती !

गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात.

कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते , तिथली प्रभावळच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात.
उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी अश्या दत्त महाराजांचे दर्शन होते.

मग “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान” हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.
अशी माझी भावना आहे.

अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक, मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहिल काय ?
म्हणूनच तिथे बुद्धी कुंठीत होते. हे स्वाभाविक आहे.
खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बर का !!

पण खरे सांगू का तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते, काहीच सुचत नाही.
मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले 😊 मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते.

महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्या प्रमाणे ” तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणिता न दुजा त्राता.”

हे प्रभो आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो.

Source: Unknown Author💐