संततधार विधी म्हणजे काय ?

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (१२)

संततधार विधी म्हणजे काय ?

असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.

त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद्दोनच होतात.

To book your puja visit our website.

देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.

श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.

संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.

।।श्रीगुरूदेवदत्तार्पणमस्तु।।

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान,
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.

Source: Unknown Author

गिरनार म्हणजेच गिरी नारायण!

दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते.
१०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहतो. पहिल्यांदा जाणारे भाविक “नंतर मी परत येणार नाही हो” असेच म्हणताना दिसतात. 😊
पण गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. मग दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात.

जर आपण गुजरात प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केला तर बहुतांश प्रदेश हा सपाट आणि मैदानी आढळून येतो, मग जुनागढ लागले की गिरनारची भव्यता खरोखरच लक्ष वेधून घेते.
बाकीचा सर्व प्रदेश मैदानी म्हणल्यावर मधेच एवढा मोठा पर्वत आला कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच.
हे काम नक्कीच नैसर्गिक नाही तर एक दैवी रहस्य आहे हे जाणकार ओळखून आहेत.

To book your puja visit our website. 🙏🏻😌

गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासेल, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध आहे. म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे.

थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, असे मला वाटते.
पहिल्या ७५०० पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो.
खरे आहे कारण आपले कर्मबंध, इच्छा आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात, आता मूलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो?

मग मनोधैर्य वाढविण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, त्याशिवाय तरणोपाय नाही 😊.

अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गिर्यारोकांनासुद्धा ५०० पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. आहे का नाही मजेदार अनुभूती !

गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात.

कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते , तिथली प्रभावळच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात.
उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी अश्या दत्त महाराजांचे दर्शन होते.

मग “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान” हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.
अशी माझी भावना आहे.

अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक, मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहिल काय ?
म्हणूनच तिथे बुद्धी कुंठीत होते. हे स्वाभाविक आहे.
खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बर का !!

पण खरे सांगू का तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते, काहीच सुचत नाही.
मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले 😊 मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते.

महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्या प्रमाणे ” तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणिता न दुजा त्राता.”

हे प्रभो आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो.

Source: Unknown Author💐

श्री महादेव रूद्राभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती.

कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवाला अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये शिंपडावे.

रुद्राभिषेकाचे महत्व

रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.

श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:

१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः” असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

२] अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात.

एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]

सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]

त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.

या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

अभिषेक :

अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.

श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक.

रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने.
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने.
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने.
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१ आवर्तने

©️ Guruji On Demand

तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते?

तुळसी विवाह
महत्व –
भगवान श्रीविष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्याचा हा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, तुळस ही लक्ष्मी स्वरुप मानली जाते. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते.

शास्त्रीय करण-
मानवी जीवनात तुळशीचे खूप मोठे महत्व आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचा नाश करते.
तुळस मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. तसेच पहाटेच्यावेळी ओझोन वायुही सोडते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

ह्या दिवशी तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करतात. तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार चढवतात. बोरं, चिंच, आवळा, कवठ कुंडीत ठेवतात. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात.
वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणाप्रमाणे तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे.

विधी व पूजा-
१.आचमन करून संकल्प केला जातो.
२.षोडशोपचारे गणपती पूजन केले जाते.
३.तुळशीची व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.
४.तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करतात.
५.त्यानंतर बाळकृष्ण व तुळस यांच्या मध्यभागी अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात.
६. महानैवेद्य व आरती करून मंत्रपुष्पांजली वाहतात.

तुळशीला आणि बालकृष्णला गोडाचा नैवेद्य व फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सवाष्ण स्त्री खण नारळाने तुळशीची ओटी भरुन प्रार्थना करते.
ह्या दिवशी दीपोत्सव करून फटाके उडवून मोठया आनंदाने उत्सव साजरा करतात.

विधीयुक्त षोडशोपचारे तुलसी पूजन करण्यासाठी गुरूजी ऑन डिमांड च्या संकेत स्थळाला भेट द्या आणि तुलसी विवाह ची वेळ आजच नोंदवा.

प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी सुरक्षित पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – 9130600429
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!

©️

तुळशीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

यंदाच्या दिवाळीमध्ये करा आरोग्यलक्ष्मीची पूजा!

दीपावली उत्सव

दिवाळी, दीपावली, दीपोत्सव अशा वेगवेगळ्या नावाने ह्या उत्सवाची ओळख आहे.
दिवाळीला सर्वत्र दिवे-पणत्या लावतात. वसुबारस, आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) व यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असे सहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. तसेच आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.

Book your Guruji for puja along with puja-samagri on www.gurujiondemand.com

दीपावली शास्त्र

कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी लक्ष्मी पूजन करतात. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजे केरसुणी पुजतात.
बलीप्रतिपदा दैत्यराज बलीचा नाश करुन त्रस्त जनतेची सुटका केल्याच्या उत्सवाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात.

१.वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

२.धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण त्रयोदशीस हा सण साजरा केला जातो.आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. यादिवशी धन्वंतरीची पूजा करतात. तसेच गुप्तधनाची किंवा पिढ्यानपिढ्या जपलेल्या धनाची पुजा केली जाते.

३. नरकचतुर्दशी- यादिवशी पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. यालाच बोलीभाषेत पहिली आंघोळ म्हणले जाते. तसेच घरात अपमृत्यु टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते.

४. लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. देवी लक्ष्मी ला कुंकुमार्चन अभिषेक केले जाते. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजेच केरसुणीची पुजा केली जाते.

५. बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी दैत्यराजा बळीचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. कारण भगवान विष्णुअवतार वामनाने बळीला पाताळात गाडले तेव्हा त्याला असा वर दिला कि या दिवशी भूतलावर तुझे पुजन केले जाईल. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
ह्या दिवसाला विशेष महत्व आहे म्हणजेच आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.
यादिवशी व्यापारी लोक वही पूजन म्हणजेच सरस्वती पूजन करतात. यालाच चोपडी पूजन देखील म्हणतात.
तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते त्यानिमित्ताने लोक सत्यनारायण पूजा देखील करतात.

६. भाऊबीज / यमद्वितीया
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बहिणभावाच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

संपूर्ण दीपावली उत्सवात धन्वंतरी पूजन , लक्ष्मी पूजन, वही / सरस्वती पूजन सत्यनारायण पूजा तसेच विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात.

©️ Guruji On Demand

अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाणारे कोजागिरी पौर्णिमा व्रत…

अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा केली जाते.

अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ ही येणाऱ्या
30 ऑक्टोबर 2020 रोजी येत आहे.
कोजागिरी उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ ह्या वेळेमध्ये केला जातो.
इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची मनोभावे पूजा केली जाते.

kojagiri pornima vrat

https://gurujiondemand.com/

ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते , बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.

चंद्राची किरणे पडलेले दूध आरोग्यासाठी खूप उपायकारक असते असे मानले जाते।ल.

  • पूजाविधी मांडणी :-

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्यात आंब्याचा डहाला घ्यावा.
अशी मांडणी मुहूर्ताच्या आधी करून ठेवावी. दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे.

४) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुधामध्ये एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा

शक्य झाल्यास गायत्री मंत्राचे पठाण करावे. तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा वाचावा.
दुधाचा नैवेद्य उपस्थित व्यक्तींनी घ्यावा.

लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर ह्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक मनोभावे पूजा करतात.

©️ Guruji On Demand

पितृपक्षात श्राद्ध का कराल?

भाद्रपदात मासातील कृष्णपक्ष म्हणजेच वद्य पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या काळ म्हणजेच “पितृपक्ष ”.
पितृपक्षास महालय असेही म्हणतात.
पितृपक्षात पूर्वजांना म्हणजेच पितरांना जेवणाचे पान ठेऊन आशीर्वाद घेतला जातो.
तसेच पितृपक्ष संकल्प करणे , श्राद्ध संकल्प करणे , पिंडदान करणे तसेच भरणी श्राद्ध केले जाते .
पूर्वज सवाष्णी असेल तर आयु नवमी ला देखील श्राद्ध केले जाते.
पितृपक्षात पितर गेलेल्या तिथीला संकल्प व तर्पण करून त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवावे. पितर म्हणुन त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीस जेऊ घालतात.

जाणून घ्या, काय आहे गुरुजी ऑन डिमांडची मोक्ष सेवा…

दिनांक १ जून २०२० पासून पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात “मोक्ष सेवा” हि सेवा सुरु झाली आहे या सेवेच्या अंतर्गत मृत्यू नंतर मंत्राग्नि पासून 14 व्या दिवशी च्या उदकशांती पर्यंत लागणारे गुरुजी व पूजेचे साहित्य देण्याचे कार्य होते.


पुण्या सारख्या मोठ्या शहरामध्ये आजमितीला अंत्यविधी करण्यासाठी अनेक प्रकारच्या साहित्याची तसेच गुरुजींसाठी शोधाशोध करावी लागते. कोणाचाही मृत्यू हा त्याच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुःखद प्रसंग असतो. अशा प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना या सर्व गोष्टी जमविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते,घरच्यांना दुःखाच्या क्षणी वेळ देणे गरजेचे असते पण कर्तव्याप्रति माणूस बांधलेला असतो म्हणून त्याला स्वकीयांना वेळ देता येत नाही. अशा प्रसंगी गुरुजी ऑन डिमांड त्यांची समस्या सोडवून सर्व गोष्टी एकाच क्लीक वर अथवा एकाच फोन कॉल वर सर्व गोष्टी उपलब्ध करून देत आहे.
या योजने अंतर्गत मंत्राग्नि, दशक्रिया, अकरावा, बारावा, तेरावा पंचक शांती, तत्रिपाद शांती तसेच उदकाशांत ह्या प्रकारचे विधी साहित्य सहीत केले जातात.
हे सर्व विधी गुरुजी ऑन डिमांड च्या मोबाईल अँप् वरून किंवा वेब साईट वरून याजमान बुक करू शकतात व प्रसंगी मोबाईल फोन वरून सुद्धा बुकिंग करता येऊ शकते. तसेच वरील पूजा ह्या एकत्रित किंवा वेगवेगळ्या सुद्धा बुक करता येऊ शकतात. या साठी गुरुजी ऑन डिमांड २४ तास सेवा देते. २४ तास मदतीसाठी ९५५२००७८७७ ह्या मोबाईल नंबर वर संपर्क करता येतो.

आपले नम्र,
गुरुजी ऑन डिमांड
पुणे व पिंपरी चिंचवड.
अधिक माहिती साठी संपर्क – ७३१८५७७७७२
वेब साईट :- www.gurujiondemand.com

अक्षय्य तृतीया आणि दानाचे महत्व

वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी अक्षय्य तृतीया हा सण येतो. या दिवशी बुधवार आणि चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर महापुण्यकारक समजला जातो. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगण्यात आले आहे,

अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ॥


श्रीकृष्ण म्हणतात,

हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान हवन क्षयाला जात नाही. म्हणून हिला मुनींनीअक्षय्य तृतीयाअसे म्हटले आहे.’

अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांतला एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच शुभ कामाला प्रारंभ केला जातो. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात. या सणालाआखेतीअसेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेसंबंधी एक कथा सांगितली जाते.

प्राचीन काळी शाकल नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज ईश्वराची पूजा करत असे. तसेच तो नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य सांगितले. ते ऐकून तो प्रभावित झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने नदीवर जाऊन स्नान केले. ईश्वराची पूजा केली. पितरांचे स्मरण केले. नंतर त्याने पाण्याने भरलेल्या घटाचे दान केले. अशा रितीने त्याने आपला उपक्रम नित्यनेमाने चालू ठेवला. प्रत्येक अक्षय्य तृतीयेला तो दान करू लागला. त्याला जीवनात कशाचीही कमतरता पडली नाही. त्याला जीवनात अक्षय आनंदाची प्राप्ती झाली.

या कथेमागचा हेतू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केले तर अक्षय सुखसमाधानाची प्राप्ती होते असा आहे.

दानाचे महत्त्व

भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याजवळ आहे त्यांनी ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दानम्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, काय डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एव्हढेच नव्हे तर तसा फलकही लावला जातो. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले या दोन्ही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे म्हटले जाते. दान दिल्याने पुढच्या नव्हे याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते.

गुढी उभारण्याचे साहित्य

या किट मध्ये आम्ही पुढील साहित्य देऊ-

हळद, कुंकू, उदबत्ती, रांगोळी, नारळ, तांदुळ, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, काडेपेटी, मध, धने, गुळ, जीरे, उपर्ण, दोरा गुंडी, सुतळी, शेण -गोव-या, चंदन पावडर (मनोहर सुगंधी), खोबरे वाटी, विड्याची पाने, गुढीसाठी साखरेच्या गाठी, कडुनिंबाचे डहाळे, फुले आणि हार

पुढील गोष्टी यामध्ये नसतील-

तांब्या, ताम्हण, पळी-भांडे, पाट, गुढी उभारण्यासाठी काठी, दिवा, पंचामृत, रेशीम वस्त्र, ब्लाऊज-पीस