जाणून घ्या ” महाशिवरात्र” म्हणजे काय ?

माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कार्य आहे.

`महाशिवरात्री’ म्हणजे काय ?

पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी –

उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी.

गुरुजी ऑन डिमांडच्या माध्यमातून करा लघुरुद्र – त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://tinyurl.com/vtjx57j


शिवपूजेची वैशिष्ट्ये :

१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.

२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.

३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.

४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.

५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

शनी ग्रह रास बदलतोय ! जाणून घ्या काय होईल तुमच्या राशीवर परिणाम….

येत्या २४ तारखेपासून शनी महाराज धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहेत.
पुण्यकाळ : शुक्रवारी सकाळी ६:५९ ते दुपारी १२:४७ पर्यंत आहे.
पुण्यकाळात जप , दान , पूजा करणे पुण्यकारक व पीडापरिहारक आहे.

मकर राशीचा शनी – मकरेस पहिला, धनुस दुसरा, वृश्चिकेस तिसरा, तुळेस चौथा, कन्येस पाचवा, सिंहेस सहावा, कर्क राशीस सातवा, मिथुनेस आठवा, वृषभेस नववा, मेषेस दहावा, मिनेस अकरावा आणि कुंभेस बारावा या प्रमाणे आहे.

राशी परत्वे फळ :
राशी पाद फळ
सिंह – मकर – मीन – सुवर्ण चिंता
वृषभ – कन्या – धनु – रौप्य शुभ
मेष – कर्क – वृश्चिक – ताम्र श्रीप्राप्ती
मिथुन – तुला – कुंभ – लोह कष्ट

साडेसाती असलेल्या लोकांनी व्यवहारिक जगात वावरताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे,अनावश्यक वाद,अहंकार, मीपणा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
या काळात अनेक उत्तम गोष्टी ही आयुष्यात घडतात.

उपाय :
१.पीडा परीहारास शनी जप आणि दान करावे तसेच येणाऱ्या २४ जानेवारी ला शनी अथवा मारुती ला अभिषेक करून घ्यावा.
२.धनु – मकर – कुंभ राशीस साडेसाती असून या राशीच्या लोकांनी पिडपरिहारार्थ शनीचा तैल अभिषेक , जप व दान करावे.
३. रोज मारुती स्तोत्र पठण करावे,तसेच मारुतीचे दर्शन घ्यावे किंवा शनी महात्म्या वाचावे.

मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते?

गौरी : अरे वा माई आजी, मकरसंक्रांती निमित्त हलव्याचे किती सुंदर दागिने बनवले आहेस. आजी आपले बाकीचे सण कुठल्या तारखेला येतील ते निश्चित नसते. म्हणजे बघ कधी दिवाळी ऑक्टोंबर मध्ये येते तर कधी नोव्हेंबर. अधिक महिना आला तर अजुन मोठे बदल होतात. पण मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच येते ते कसे काय ?

Gurujiondemand

माई आजी : गौरी, त्यासाठी तुला हिंदू महिने आणि इंग्रजी महिने समजून घ्यावे लागतील. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. आपले सगळे सण हे तिथी नुसार असतात, म्हणजेच चांद्र कालगणनेनुसार असतात. तर इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत. त्यामुळे हिंदू सण कधी कुठल्या इंग्रजी महिन्यात येणार हे बदलत राहते.

आता मकर संक्रांत म्हणजे काय ते समजून घेऊ. मुळात संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य बारा राशीतून जात असतो त्यामुळे १२ संक्रांत होत असतात. मकर संक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. अशी ही संक्रांती इंग्रजी महिने प्रमाणेच सूर्याशी संबधित असल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख ही १५ जानेवारी आहे.


गौरी : पण मग कधी १४ कधी १५ जानेवारी असे का ?

माई आजी : पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते.पृथ्वी स्वतःभोवती तीच्या अक्षाभोवती फिरते. हा पृथ्वीचा कललेल्या अक्ष देखिल स्थिर नसून २६,००० वर्षांमध्ये तो गोल फिरतो. त्या गतीला ‘परांचन गती’ (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion) असे म्हणतात. या गतीमुळे ठराविक वर्षानंतर सूर्याला पुन्हा मकर राशीत प्रवेश करण्यास १ दिवसाचा उशीर होतो. म्हणून ही तारीख सुद्धा बदलत असते. कोणी म्हणतो दर ७२ वर्षांनी तर कोणी म्हणतो ८० तर कोणी म्हणतो १०० वर्षांनी हा एक दिवसाचा फरक पडतो. म्हणून कधी १५, कधी १४, कधी १३ जानेवारीला मकर संक्रांत झाली होती.


गौरी : आजी हे उत्तरायण म्हणजे काय ? याचा मकरसंक्रांतीशी काय संबंध आहे ?

माई आजी : हे बघ, पृथ्वी स्वतः भोवती फिरते म्हणजे ती तिच्या थोड्याशा कललेल्या आसाभोवती फिरते आणि त्याचवेळी ती सूर्या भोवती पण फिरत असते. तिच्या आसामुळे काय होते की सूर्याभोवती फिरताना साधारण सहा महिने उत्तर गोलार्धाचा भाग सूर्याच्या जास्त जवळ जात असतो. त्यामुळे त्याकाळात दिवस मोठा आणि रात्र छोटी होताना दिसते. याला “उत्तरायण” म्हणतात. पण हेच जेव्हा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ असतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस छोटा आणि रात्र मोठी होते. याला दक्षिणायन म्हणतात.

२२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला जातो. या तारखेपासून उत्तरायण सुरू होते. काळोख कमी होऊन उजेड वाढत जातो. असे म्हणतात की सुमारे 2000 हजार वर्षांपूर्वी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की, उत्तरायण सुरू होत असे. उत्तरायण सुरू झाल्याचा आनंद म्हणून मकरसंक्रांत सणाच्या रुपात साजरी केली जात असे. हे उत्तरायण सुरू होते तेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धात 23 1/2 अंशांवर तळपत असतो. म्हणूनच विषुववृत्तापासून 23 1/2 अंशांवर असणाऱ्या अक्षवृत्तास मकरवृत्त हे नाव पडले. ऋतु बदलू लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होत असते. हिवाळ्यात मिळेल ती उष्णता जास्त प्रमाणात शोषून ऊर्जा मिळवण्यासाठी गडद रंगांचा वापर केला जातो. काळया रंगाचा हा उपयोग तर सर्वश्रुत आहेच. पण इथून पुढे त्याची आवश्यकता नसते. हे दर्शवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आणि पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने अंधराकडून उजेडाचे प्रतीक म्हणून वापरले जातात.


गौरी : वा आजी किती छान माहिती दिलीस. आजी मोठ्या रात्री कडून मोठ्या दिवसाकडे जाताना वाटेत लागणारी पहाट कोण माहीत आहे का ?

माई आजी : अरे वा गौरी, सांग बरं ती पहाट म्हणजे काय ?

गौरी : धुंधुरमास !
आजी हा हा कुठला मराठी महिना नाही तर धुंधुरमास म्हणजे सूर्य धनू राशीत असतो तो काळ. रात्र आणि दिवसाच्या मधली पहाट! म्हणूनच तर या महिन्यात पहाटे लवकर उठून शेकोटीची ऊब घेतात, हुरडा खातात, तीळ लावलेली भाकरी, गूळ खाऊन शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. भोगीचा सण म्हणजे धुंधुरमास चा शेवटचा दिवस ! बरोबर की नाई ?

माई आजी : वा गौरी, किती सुरेख वर्णन केलेस ! चल मग ही भौगोलिक माहिती सणाच्या रुपात पुढच्या पिढी कडे सोपवणाऱ्या आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगू आणि साजरी करू मकरसंक्रांत !

© सौ रश्मी साठे उन्हाळे.
परंपरा मंच

वास्तूशांतीचा मुहूर्त मिळत नाहीये? हे आहेत उपाय…

वास्तुशांती चा मुहूर्त नाही? नवीन घरी राहायला जाता येत नाही? ह्याला उपाय आहे!

काही वेळा नवीन घर बांधून होते किंवा नवीन घर घेतलेलं असतं पण वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. कधी तरी घरमालकांचा तगादा असतो किंवा नवीन घरात रहायची ओढ, अशी बरीच कारणे असतात. मग अश्या वेळेस मुहूर्त नसल्यास काय करावे? अहो घाबरू नका, ह्याला उपाय आहे.

वास्तुशांती केल्याखेरीज नव्या घरात राहण्यास जाऊ नये असे नाही. अश्या वेळेस उदकशांती अथवा ग्रहयज्ञ करून गृहप्रवेश करावे. तत्पूर्वी ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घेऊन त्यादिवशी हळदकुंकू, पाण्याने भरलेला तांब्या,थोडे तांदूळ, हार, पेढे व देवाचा फोटो प्रथम उभयतांनीं नव्या घरात नेऊन ठेवावे. देवाचे फोटो हार घालून,पेढयाचा नैवेद्य समर्पण करून नमस्कार करावा. नंतर पती आणि पत्नीने पेढा खाऊन पाणी प्यावे. ह्या धार्मिक कृत्यानंतर नंतर घरी राहावयास जावे व नंतर मुहूर्त मिळाला कि वास्तुशांती करावी. घरातील सर्व मंडळींसह मंगलकलश, दीप व देव घेऊन ब्राम्हणांनी मंत्रपठण करत गृहप्रवेश करावा. हे करणे आवश्यक आहे.

बस झालं  तर मग, आता नवीन घराचा आनंद घेण्यास तुम्ही मोकळे!


गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand



ग्रहणकाळात फलप्राप्तीसाठी करा या मंत्रांचा जप…

मंत्रोपदेश घ्यावयाचा तो फक्त सूर्यग्रहणातच घ्यावा त्यानंतर प्रत्येक सूर्य-चंद्र ग्रहणात त्या मंत्राचे पुरश्चरण करावे म्हणजे मंत्राला मालिन्य व शिळेपणश येत नाही. गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र नवग्रहांचे मंत्र त्या त्या देवतेच्या सख्येइतक्या वेळा म्हणजे अथर्वशीर्ष २१ वेळा श्रीसूक्त १६ वेळा याप्रमाणे म्हणावे.

ग्रहणाचा पुण्यकाल कमी वेळ असेल तर ही संख्या कमी करावी कारण पुण्यकालातच हे सर्व करावयाचे आहे सौरसूक्त मात्र दोनही ग्रहणात म्हणू नये.

स्त्रियांनी पुण्यकालात स्तोत्र पाठ (महिम्न, व्यंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्त्रनाम, गणेश, देवी सहस्त्रनाम) व नामजप करावा उदा – श्रीराम जयराम जय जय राम.. रघुपति राघव राजा राम… नमो भगवते वासुदेवाय …नमो भगवते गजाननाय…

ग्रहण स्पर्श व मोक्षस्नाने पुरुषानी डोक्यावरून करावी सुवासिनी स्त्रियानी मात्र गळ्याखालील करावी.

दर्भ ठेवलेली वस्तू बिघडत नाही हे आता विज्ञानानी सिद्ध झाले आहे दर्भ ठेवलेली वस्तू अपवित्र होत नाही म्हणून लोणची इत्यादि पदार्थावर दर्भ ठेवण्याची प्राचीन पद्धति आहे दर्भ ठेवलेले वस्त्र ग्रहणानंतर घेण्यास हरकत नाहीज्या कपड्याना ग्रहण काळात आपण शिवलो नाही, त्या वस्तू विटाळत नाहीत .

संदर्भ- धर्मशास्त्रीय निर्णय, दाते पंचांग.

गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand

 

पौर्णिमा 12 तारखेला , मात्र दत्तजयंतीची पुजा करा 11 तारखेलाच…..

मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस म्हणजे दत्तजयंती हा प्रत्येक दत्तभक्तासाठी अपुर्व सोहळा असतो. मात्र यावर्षी कॅलेंडरमध्ये दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी पौर्णिमा दिली असुनही आदल्या दिवशी म्हणजे दि. ११ रोजी ‘दत्तजयंती’ साजरी करावी अस सांगितलय. तर हे कस ?? असा प्रश्न सामान्य जनांस पडतो.


याच कारण “धर्मसिंधु” ग्रंथात असे आहे कि ज्या दिवशी “प्रदोषव्यापिनी” म्हणजे सायंकाळचे वेळी सर्वात जास्त काळ पौर्णिमा आहे असा दिवस दत्तजयंती म्हणुन साजरा करावा. याशिवाय “निर्णयसिंधु” ग्रंथ असे सांगतो कि अठरा घटिका पेक्षा कमी म्हणजे सर्वसाधारण ७ तास १२ मिनिटापेक्षा कमी वेळ चतुर्दशी असुन नंतर पौर्णिमा असेल तो दिवस पौर्णिमेच्या कोणत्याहि व्रतास योग्य व इष्ट समजावा. म्हणजेच दि. ११ रोजी सकाळी १०:५९ वा. चतुर्दशी संपुन पौर्णिमा सुरु होते व ती दि. १२ डिसेंबर रोजी स. १०:४२ पर्यंत आहे. म्हणुन दि. ११ चा दिवस सर्वप्रकारच्या दत्तजन्मासाठी म्हणजे दुपारी १२ वा. आणि सायंकाळी ६ वाजता साजर्‍या होणार्‍या दत्तजयंतीसाठी इष्ट समजावा.
याचाच अर्थ यावर्षी दि. ११ डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी. अभिषेक, याग, अन्नदान (फराळ) यासाठी दि. ११ चाच दिवस इष्ट समजावा.


दत्तजंयतीसाठी गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि दत्तयागासाठी परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच मागवण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
https://gurujiondemand.com/catalogue/datta-jayanti-pujan_109/


संदर्भ- धर्मसिंधु, निर्णयसिंधु, दाते पंचांग.

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand