भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी….

श्री दत्तजयंती माहिती अणि दत्त जन्माची कथा

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी श्रीदत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत व गावागावात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
www.gurujiondemand.com

दत्तजयंतीचे महत्त्व
दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. यादिवशी दत्तात्रेयांच्या मुर्तीस तसेच दत्तस्वरुप असलेल्या औदुंबर वृक्षास अभिषेक केला जातो. तसेच एखादी दिर्घ मनोकामना पुर्ण होण्यासाठी ‘दत्तयाग’ केला जातो.
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेने अनेकांच्या मनोकामना पुर्ण झाल्याचे अनुभव दृष्टीस पडतात.
www.gurujiondemand.com
ज्या घरात पितृपिडा अथवा बाधा आहे त्या घरात नित्य दत्तउपासना केल्यास मुळापासून बाधेचा परिहार होतो.

श्री दत्त जन्मोत्सव साजरा करणे
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी तीन अथवा सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.
www.gurujiondemand.com

श्री दत्त जन्माची कथा
अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची आणखी एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.
याशिवाय श्री गुरुचरित्राच्या चवथ्या अध्यायामध्येही श्रीदत्त जन्माची कथा आहे.
www.gurujiondemand.com

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण / दिनचर्या
श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत.

अशा या लोकप्रिय दैवत असणार्‍या श्रीदत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरीचे व्रत

अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा केली जाते.

अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ ही येणाऱ्या
१९ ऑक्टोबर २०२१ रोजी येत आहे.
कोजागिरी उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ ह्या वेळेमध्ये केला जातो.
इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची मनोभावे पूजा केली जाते.

ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते , बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.
चंद्राची किरणे पडलेले दूध आरोग्यासाठी खूप उपायकारक असते असे मानले जाते।ल.

पूजाविधी मांडणी :-
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्यात आंब्याचा डहाला घ्यावा.
अशी मांडणी मुहूर्ताच्या आधी करून ठेवावी. दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे.

४) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुधामध्ये एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा

शक्य झाल्यास गायत्री मंत्राचे पठाण करावे. तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा वाचावा.
दुधाचा नैवेद्य उपस्थित व्यक्तींनी घ्यावा.

लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर ह्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक मनोभावे पूजा करतात.

कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे!

शारदीय नवरात्र
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.
आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.
नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.
अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे.
राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते.
*नवरात्र व्रताचे प्रकार:-
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत

नवरात्रीची अंगे:- नवरात्रीची प्रमुख ४ अंगे
१) देवतास्थापन
२) मालाबंधन
३) नंदादीप(अखंड दीप)
४) कुमारिकापूजन
ही आहेत.
काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत.
नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात.
नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णुसहस्रनाम वाचावे. नवरात्रात मालाबंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी. कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.

कुमारिकापूजनाचे फळ पुढीलप्रमाणे:–*
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्यप्राप्ती
२ कुमारिका पूजन– भोग व मोक्ष प्राप्ती
३ कुमारिका पूजन — धर्म व अर्थ प्राप्ती
४ कुमारिका पूजन– राज्यपदप्राप्ती
५ कुमारिका पूजन– विद्या प्राप्ती
६ कुमारिका पूजन– षट् कर्म सिद्धी
७ कुमारिका पूजन—राज्य प्राप्ती
८ कुमारिका पूजन–संपत्ती
९ कुमारिका पूजन–पृथ्वीचे राज्य मिळते.

|| जय श्रीविंध्यावासींनी ||

नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ?

नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन.
दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते.
*राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. तसेच विविध इच्छापूर्ती साठी सप्तशती पाठ केले जातात.
अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.

नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे:-
रविवारी -पायस(खीर)
सोमवारी -गायीचे तूप
मंगळवारी -केळी
बुधवारी – लोणी
गुरुवारी -खडीसाखर
शुक्रवारी – साखर
शनिवारी -गायीचे तूप.

नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र /महालक्ष्मी अष्टक/ कनकधारा स्तोत्र /रामरक्षा/ देव्यपराध स्तोत्र /श्रीसूक्त/शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे.
तसेच जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा.
१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परान्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन
३) दाढी व कटिंग करू नये
४) गादीवर, पलंगावर न झोपणे.

सोमप्रदोष – कार्यसिद्धी व इच्छापूर्ती करणारे व्रत

श्रीशंकर पार्वतीची प्रत्येक प्रदोषा दिवशी पूजा केली जाते. सर्वसाधारणपणे त्रयोदशी तिथीला प्रदोष असतो. सोमवारी येणार्‍या प्रदोषास सोम प्रदोष म्हणतात. सोमप्रदोषाचे व्रत अधिक शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी दिवसभरात कधीही, विशेषकरून सायंकाळी श्री महादेवाची पुजा केली जाते. आपल्या धर्मात महत्वपुर्ण मानल्या गेलेल्या श्रीगुरुचरित्र या ग्रंथात सोमप्रदोषाचे महत्व सांगितले आहे. याचबरोबर शिवपुराण तसेच श्रीशिवलिलामृत या ग्रंथातही सोमप्रदोषाचे महत्व सांगितले आहे.

👉🏻 सोमप्रदोष का करावा ?
वरील ग्रंथातील अनेक उल्लेखानुसार मनातील अनेक वर्षांपासूनची इच्छा पुर्ण होण्यासाठी, तसेच कार्यसिद्धी होण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत केले जाते. गुरुचरित्र ग्रंथातील उल्लेखानुसार प्राणसंकट टळण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत केले जाते.

🕉️ सोमप्रदोषाचा पूजा विधी :
ह्या दिवशी उपवास केला जातो. कोणत्याही मंदिरातील अथवा आपल्या घरामधील देवघरात असलेल्या शिवलिंगाची पुजा केली जाते. आपण ज्यासाठी प्रदोषाची पुजा करणार आहोत तो संकल्प आपल्या गुरुजींकडुन यथासांग सोडावा. त्यानंतर महादेवाच्या पिंडीस पाणी, पंचामृत, उष्णोदक इ. ने स्नान घालावे. त्यानंतर रुद्राच्या आवर्तनाने अभिषेक करावा. यानंतर देवास हळद कुंकू अक्षदा, अत्तर, बेल फुले वाहून धूप दीप करावे. यादिवशी शक्य झाल्यास १०८ बेलपत्र वहावे त्यावेळी ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचे पठण करावे. शिवपंचाक्षर स्तोत्र, शिवस्तूती, शिवलीलामृत यापैकी जे शक्य असेल त्या स्तोत्राचे अथवा ग्रंथाचे वाचन करावे. आपल्या मनातील इच्छा बोलुन श्रीमहादेवास दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करावी. हे व्रत ११ च्या प्रमाणात म्हणजे किमान ११ प्रदोष किंवा ११ वर्षे केले जाते. अनेक लोकांना या व्रताचे निश्चित फळ प्राप्त झाले आहे.

🛕कोणते प्रदोषव्रत कशासाठी ??

सोमप्रदोष- इच्छापुर्ती, कार्यसिद्धी, प्राणसंकटापासुन रक्षण.

भौमप्रदोष- अर्थिक संकटापासुन रक्षण, ऋणातुन मुक्ती, अर्थिक स्थैर्य

शनिप्रदोष- संततीप्राप्ती.

पक्षप्रदोष (वरील तिन्हीसह इतर वारी येणारा) – सर्वप्रकारची ऐहिक सुखे मिळावीत यासाठी.
=======🕉️======

🙏🏻शिव पंचाक्षर स्तोत्र🙏🏻

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै नकाराय नमः शिवाय

मन्दाकिनी सलिल चन्दन चर्चिताय
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय
तस्मै मकाराय नमः शिवाय

शिवायगौरी वदनाब्जबृंदा
सूर्याय दक्षाध्वर नाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय
तस्मै शिकाराय नमः शिवाय

वशिष्ठकुम्भोद्भव गौतमाय
मूनीन्द्र देवार्चिता शेखराय ।
चन्द्रार्क वैश्वानर लोचनाय
तस्मै वकाराय नमः शिवाय

यज्ञस्वरूपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय
तस्मै यकाराय नमः शिवाय

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसंनिधौ ।
शिवलोकमावाप्नोति शिवेन सह मोदते🙏🏻

👉🏻प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी शास्त्रोक्त पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – ९१३०६००४२९/ ७३१८५७७७७२
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!

गुढी पूजन कसे करावे?

गुढी पूजन कसे करावे?

चैत्र शुद्ध ।।१।। (प्रतिपदा) म्हणजेच उद्याची १३ एप्रिल २०२१. ह्या दिवशी दाराला तोरणे लावून गुढ्या उभारून नाव वर्षाचे स्वागत केले जाते.
आपली कालगणना हजारो वर्ष पूर्वीची आहे तसेच ती आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून कळते, म्हणून ह्यादिवशी प्रामुख्याने पंचांग पूजन केले जाते.

एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर गडू उपडा घालतात. कडूनिंबाची दहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात. त्याला हळदी , कुंकू , अक्षदा , धने , फुले वाहून पूजा करावी तसेच धूप दीप करून नैवेद्य दाखवावा. आणि येणारे वर्ष सुख – समृद्धी , आरोग्यदायी तसेच मंगलमय जावो अशी प्रार्थना केली करावी. ह्यालाच ब्रह्मध्वज असे म्हणतात.
ह्यावर्षी प्लव नावाचे सवंत्सर आहे.

मंत्र :
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु ।।

अशा रीतीने ब्रह्मध्वजाची प्रार्थना करवी.

अर्थ:
इच्छा पूर्ण करणारा तसेच उत्तम फळ देणाऱ्या ब्रह्मध्वजास नमस्कार असो.
नवीन वर्षात माझ्या घरात मंगलमयता यावी.

ब्रह्मध्वज पूजन झाल्यानंतर पंचांग पूजन करावे, या दिवशी पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||”

अर्थ – तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.

गोडाचा नैवेद्य दाखवून भोजन करावे. सूर्यास्ता वेळी गुढी उतरवून ठेवावी.
हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

।।शुभं भवतु ।।

होळी चे पौराणिक महत्व आणि कृषी विषयी महत्व

होळी.
पौराणिक महत्व- लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे.

कृषी संस्कृतीतील महत्व-
शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
www.gurujiondemand.com

गणेश जयंती

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते.
तिल कुंद चतुर्थीला गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतं. गणपती चे स्पंदन आणि चतुर्थीला धरती स्पंदन समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकूल मानले गेले आहे अर्थात या दिवशी गणपती उपासना केल्याने निश्चित लाभ होतं. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे विधान सांगितले गेले आहे. 
या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिल मिश्रित पाण्याने आंघोळ केली जाते.
भगवान गणेशाला प्रार्थना केल्याने ज्ञान, मुले, पैसा आणि समृद्धीची प्राप्त होते.

गणपती बाप्पा मोरया !!!

ह्यादीवशी लोक गणपतीची उपासना म्हणून
१.गणपती अथर्वशीर्ष अभिषेक,
२.गणेश सहस्त्र आवर्तन
३. गणेश होम
४. गणेश याग
५. सत्यविनायक इ.
प्रकारचे विधी केले जातात.

प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी सुरक्षित पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – ९१३०६००४२९/ ७३१८५७७७७२
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!

श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी) (१)

श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी) (१)

स्थान: आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट
सत्पुरूष: श्रीपादश्रीवल्लभ
विशेष: तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण
पादुका: श्रीपाद श्रीवल्लभ पादुका

उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

या मंत्राचा उच्चार होताक्षणी नजरेसमोर येते ते ‘श्री क्षेत्र कुरवपूर’ या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते.

दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत.

To book your puja visit our website.

सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते; पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात.

‘आश्विन वद्य व्दादशी’ हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.

रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो.

नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरूजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आत शेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण तीन मैल लांब, तीन फर्लांग रूंद असे असून कूर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत.

Author – Unknown source

संततधार विधी म्हणजे काय ?

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (१२)

संततधार विधी म्हणजे काय ?

असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.

त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद्दोनच होतात.

To book your puja visit our website.

देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.

श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.

संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.

।।श्रीगुरूदेवदत्तार्पणमस्तु।।

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान,
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.

Source: Unknown Author