गिरनार म्हणजेच गिरी नारायण!

दत्त संप्रदायातील जवळपास प्रत्येकाचा असा अनुभव आहे की दर वेळेस गिरनार त्यांना नित्य नूतन भासतो, वेगळेच चैतन्य जाणवते.
१०,००० पायऱ्या चढून जायच्या आहेत म्हणून बरेच नवखे भांबावून जातात, कारण गिरनार खरोखरच भव्य दिव्य असाच आहे. गिरनार खरोखरच प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहतो. पहिल्यांदा जाणारे भाविक “नंतर मी परत येणार नाही हो” असेच म्हणताना दिसतात. 😊
पण गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. मग दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात.

जर आपण गुजरात प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केला तर बहुतांश प्रदेश हा सपाट आणि मैदानी आढळून येतो, मग जुनागढ लागले की गिरनारची भव्यता खरोखरच लक्ष वेधून घेते.
बाकीचा सर्व प्रदेश मैदानी म्हणल्यावर मधेच एवढा मोठा पर्वत आला कुठून हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच.
हे काम नक्कीच नैसर्गिक नाही तर एक दैवी रहस्य आहे हे जाणकार ओळखून आहेत.

To book your puja visit our website. 🙏🏻😌

गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासेल, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध आहे. म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे.

थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, असे मला वाटते.
पहिल्या ७५०० पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो.
खरे आहे कारण आपले कर्मबंध, इच्छा आकांक्षा, अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात, कारण त्या मूलाधार चक्राशी संलग्न असतात, आता मूलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का? त्रास होणारच. सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो?

मग मनोधैर्य वाढविण्याचा एकच उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे, त्याशिवाय तरणोपाय नाही 😊.

अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गिर्यारोकांनासुद्धा ५०० पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. आहे का नाही मजेदार अनुभूती !

गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात.

कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतात. फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते , तिथली प्रभावळच तशी आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात.
उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी अश्या दत्त महाराजांचे दर्शन होते.

मग “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान” हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.
अशी माझी भावना आहे.

अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक, मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहिल काय ?
म्हणूनच तिथे बुद्धी कुंठीत होते. हे स्वाभाविक आहे.
खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बर का !!

पण खरे सांगू का तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते, काहीच सुचत नाही.
मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते, अरे हे राहूनच गेले 😊 मग तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते.

महाराजांना एकच विनंती, करुणा त्रिपदी मध्ये लिहिल्या प्रमाणे ” तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणिता न दुजा त्राता.”

हे प्रभो आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणवेस अशी मी प्रार्थना करतो.

Source: Unknown Author💐

तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते?

तुळसी विवाह
महत्व –
भगवान श्रीविष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्याचा हा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, तुळस ही लक्ष्मी स्वरुप मानली जाते. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते.

शास्त्रीय करण-
मानवी जीवनात तुळशीचे खूप मोठे महत्व आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचा नाश करते.
तुळस मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. तसेच पहाटेच्यावेळी ओझोन वायुही सोडते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

ह्या दिवशी तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करतात. तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार चढवतात. बोरं, चिंच, आवळा, कवठ कुंडीत ठेवतात. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात.
वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणाप्रमाणे तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे.

विधी व पूजा-
१.आचमन करून संकल्प केला जातो.
२.षोडशोपचारे गणपती पूजन केले जाते.
३.तुळशीची व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.
४.तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करतात.
५.त्यानंतर बाळकृष्ण व तुळस यांच्या मध्यभागी अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात.
६. महानैवेद्य व आरती करून मंत्रपुष्पांजली वाहतात.

तुळशीला आणि बालकृष्णला गोडाचा नैवेद्य व फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सवाष्ण स्त्री खण नारळाने तुळशीची ओटी भरुन प्रार्थना करते.
ह्या दिवशी दीपोत्सव करून फटाके उडवून मोठया आनंदाने उत्सव साजरा करतात.

विधीयुक्त षोडशोपचारे तुलसी पूजन करण्यासाठी गुरूजी ऑन डिमांड च्या संकेत स्थळाला भेट द्या आणि तुलसी विवाह ची वेळ आजच नोंदवा.

प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी सुरक्षित पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – 9130600429
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!

©️

तुळशीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

यंदाच्या दिवाळीमध्ये करा आरोग्यलक्ष्मीची पूजा!

दीपावली उत्सव

दिवाळी, दीपावली, दीपोत्सव अशा वेगवेगळ्या नावाने ह्या उत्सवाची ओळख आहे.
दिवाळीला सर्वत्र दिवे-पणत्या लावतात. वसुबारस, आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) व यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असे सहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. तसेच आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.

Book your Guruji for puja along with puja-samagri on www.gurujiondemand.com

दीपावली शास्त्र

कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी लक्ष्मी पूजन करतात. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजे केरसुणी पुजतात.
बलीप्रतिपदा दैत्यराज बलीचा नाश करुन त्रस्त जनतेची सुटका केल्याच्या उत्सवाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात.

१.वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

२.धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण त्रयोदशीस हा सण साजरा केला जातो.आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. यादिवशी धन्वंतरीची पूजा करतात. तसेच गुप्तधनाची किंवा पिढ्यानपिढ्या जपलेल्या धनाची पुजा केली जाते.

३. नरकचतुर्दशी- यादिवशी पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. यालाच बोलीभाषेत पहिली आंघोळ म्हणले जाते. तसेच घरात अपमृत्यु टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते.

४. लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. देवी लक्ष्मी ला कुंकुमार्चन अभिषेक केले जाते. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजेच केरसुणीची पुजा केली जाते.

५. बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी दैत्यराजा बळीचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. कारण भगवान विष्णुअवतार वामनाने बळीला पाताळात गाडले तेव्हा त्याला असा वर दिला कि या दिवशी भूतलावर तुझे पुजन केले जाईल. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
ह्या दिवसाला विशेष महत्व आहे म्हणजेच आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.
यादिवशी व्यापारी लोक वही पूजन म्हणजेच सरस्वती पूजन करतात. यालाच चोपडी पूजन देखील म्हणतात.
तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते त्यानिमित्ताने लोक सत्यनारायण पूजा देखील करतात.

६. भाऊबीज / यमद्वितीया
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बहिणभावाच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

संपूर्ण दीपावली उत्सवात धन्वंतरी पूजन , लक्ष्मी पूजन, वही / सरस्वती पूजन सत्यनारायण पूजा तसेच विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात.

©️ Guruji On Demand

पितृपक्षात श्राद्ध का कराल?

भाद्रपदात मासातील कृष्णपक्ष म्हणजेच वद्य पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या काळ म्हणजेच “पितृपक्ष ”.
पितृपक्षास महालय असेही म्हणतात.
पितृपक्षात पूर्वजांना म्हणजेच पितरांना जेवणाचे पान ठेऊन आशीर्वाद घेतला जातो.
तसेच पितृपक्ष संकल्प करणे , श्राद्ध संकल्प करणे , पिंडदान करणे तसेच भरणी श्राद्ध केले जाते .
पूर्वज सवाष्णी असेल तर आयु नवमी ला देखील श्राद्ध केले जाते.
पितृपक्षात पितर गेलेल्या तिथीला संकल्प व तर्पण करून त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवावे. पितर म्हणुन त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीस जेऊ घालतात.

जाणून घ्या, काय आहे गुरुजी ऑन डिमांडची मोक्ष सेवा…

दिनांक १ जून २०२० पासून पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात “मोक्ष सेवा” हि सेवा सुरु झाली आहे या सेवेच्या अंतर्गत मृत्यू नंतर मंत्राग्नि पासून 14 व्या दिवशी च्या उदकशांती पर्यंत लागणारे गुरुजी व पूजेचे साहित्य देण्याचे कार्य होते.


पुण्या सारख्या मोठ्या शहरामध्ये आजमितीला अंत्यविधी करण्यासाठी अनेक प्रकारच्या साहित्याची तसेच गुरुजींसाठी शोधाशोध करावी लागते. कोणाचाही मृत्यू हा त्याच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुःखद प्रसंग असतो. अशा प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना या सर्व गोष्टी जमविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते,घरच्यांना दुःखाच्या क्षणी वेळ देणे गरजेचे असते पण कर्तव्याप्रति माणूस बांधलेला असतो म्हणून त्याला स्वकीयांना वेळ देता येत नाही. अशा प्रसंगी गुरुजी ऑन डिमांड त्यांची समस्या सोडवून सर्व गोष्टी एकाच क्लीक वर अथवा एकाच फोन कॉल वर सर्व गोष्टी उपलब्ध करून देत आहे.
या योजने अंतर्गत मंत्राग्नि, दशक्रिया, अकरावा, बारावा, तेरावा पंचक शांती, तत्रिपाद शांती तसेच उदकाशांत ह्या प्रकारचे विधी साहित्य सहीत केले जातात.
हे सर्व विधी गुरुजी ऑन डिमांड च्या मोबाईल अँप् वरून किंवा वेब साईट वरून याजमान बुक करू शकतात व प्रसंगी मोबाईल फोन वरून सुद्धा बुकिंग करता येऊ शकते. तसेच वरील पूजा ह्या एकत्रित किंवा वेगवेगळ्या सुद्धा बुक करता येऊ शकतात. या साठी गुरुजी ऑन डिमांड २४ तास सेवा देते. २४ तास मदतीसाठी ९५५२००७८७७ ह्या मोबाईल नंबर वर संपर्क करता येतो.

आपले नम्र,
गुरुजी ऑन डिमांड
पुणे व पिंपरी चिंचवड.
अधिक माहिती साठी संपर्क – ७३१८५७७७७२
वेब साईट :- www.gurujiondemand.com

अक्षय्य तृतीया आणि दानाचे महत्व

वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी अक्षय्य तृतीया हा सण येतो. या दिवशी बुधवार आणि चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर महापुण्यकारक समजला जातो. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगण्यात आले आहे,

अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ॥


श्रीकृष्ण म्हणतात,

हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान हवन क्षयाला जात नाही. म्हणून हिला मुनींनीअक्षय्य तृतीयाअसे म्हटले आहे.’

अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांतला एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच शुभ कामाला प्रारंभ केला जातो. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात. या सणालाआखेतीअसेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेसंबंधी एक कथा सांगितली जाते.

प्राचीन काळी शाकल नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज ईश्वराची पूजा करत असे. तसेच तो नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य सांगितले. ते ऐकून तो प्रभावित झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने नदीवर जाऊन स्नान केले. ईश्वराची पूजा केली. पितरांचे स्मरण केले. नंतर त्याने पाण्याने भरलेल्या घटाचे दान केले. अशा रितीने त्याने आपला उपक्रम नित्यनेमाने चालू ठेवला. प्रत्येक अक्षय्य तृतीयेला तो दान करू लागला. त्याला जीवनात कशाचीही कमतरता पडली नाही. त्याला जीवनात अक्षय आनंदाची प्राप्ती झाली.

या कथेमागचा हेतू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केले तर अक्षय सुखसमाधानाची प्राप्ती होते असा आहे.

दानाचे महत्त्व

भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याजवळ आहे त्यांनी ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दानम्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, काय डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एव्हढेच नव्हे तर तसा फलकही लावला जातो. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले या दोन्ही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे म्हटले जाते. दान दिल्याने पुढच्या नव्हे याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते.

गुढी उभारण्याचे साहित्य

या किट मध्ये आम्ही पुढील साहित्य देऊ-

हळद, कुंकू, उदबत्ती, रांगोळी, नारळ, तांदुळ, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, काडेपेटी, मध, धने, गुळ, जीरे, उपर्ण, दोरा गुंडी, सुतळी, शेण -गोव-या, चंदन पावडर (मनोहर सुगंधी), खोबरे वाटी, विड्याची पाने, गुढीसाठी साखरेच्या गाठी, कडुनिंबाचे डहाळे, फुले आणि हार

पुढील गोष्टी यामध्ये नसतील-

तांब्या, ताम्हण, पळी-भांडे, पाट, गुढी उभारण्यासाठी काठी, दिवा, पंचामृत, रेशीम वस्त्र, ब्लाऊज-पीस

जाणून घ्या ” महाशिवरात्र” म्हणजे काय ?

माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कार्य आहे.

`महाशिवरात्री’ म्हणजे काय ?

पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी –

उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी.

गुरुजी ऑन डिमांडच्या माध्यमातून करा लघुरुद्र – त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://tinyurl.com/vtjx57j


शिवपूजेची वैशिष्ट्ये :

१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.

२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.

३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.

४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.

५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते?

गौरी : अरे वा माई आजी, मकरसंक्रांती निमित्त हलव्याचे किती सुंदर दागिने बनवले आहेस. आजी आपले बाकीचे सण कुठल्या तारखेला येतील ते निश्चित नसते. म्हणजे बघ कधी दिवाळी ऑक्टोंबर मध्ये येते तर कधी नोव्हेंबर. अधिक महिना आला तर अजुन मोठे बदल होतात. पण मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच येते ते कसे काय ?

Gurujiondemand

माई आजी : गौरी, त्यासाठी तुला हिंदू महिने आणि इंग्रजी महिने समजून घ्यावे लागतील. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. आपले सगळे सण हे तिथी नुसार असतात, म्हणजेच चांद्र कालगणनेनुसार असतात. तर इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत. त्यामुळे हिंदू सण कधी कुठल्या इंग्रजी महिन्यात येणार हे बदलत राहते.

आता मकर संक्रांत म्हणजे काय ते समजून घेऊ. मुळात संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य बारा राशीतून जात असतो त्यामुळे १२ संक्रांत होत असतात. मकर संक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. अशी ही संक्रांती इंग्रजी महिने प्रमाणेच सूर्याशी संबधित असल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख ही १५ जानेवारी आहे.


गौरी : पण मग कधी १४ कधी १५ जानेवारी असे का ?

माई आजी : पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते.पृथ्वी स्वतःभोवती तीच्या अक्षाभोवती फिरते. हा पृथ्वीचा कललेल्या अक्ष देखिल स्थिर नसून २६,००० वर्षांमध्ये तो गोल फिरतो. त्या गतीला ‘परांचन गती’ (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion) असे म्हणतात. या गतीमुळे ठराविक वर्षानंतर सूर्याला पुन्हा मकर राशीत प्रवेश करण्यास १ दिवसाचा उशीर होतो. म्हणून ही तारीख सुद्धा बदलत असते. कोणी म्हणतो दर ७२ वर्षांनी तर कोणी म्हणतो ८० तर कोणी म्हणतो १०० वर्षांनी हा एक दिवसाचा फरक पडतो. म्हणून कधी १५, कधी १४, कधी १३ जानेवारीला मकर संक्रांत झाली होती.


गौरी : आजी हे उत्तरायण म्हणजे काय ? याचा मकरसंक्रांतीशी काय संबंध आहे ?

माई आजी : हे बघ, पृथ्वी स्वतः भोवती फिरते म्हणजे ती तिच्या थोड्याशा कललेल्या आसाभोवती फिरते आणि त्याचवेळी ती सूर्या भोवती पण फिरत असते. तिच्या आसामुळे काय होते की सूर्याभोवती फिरताना साधारण सहा महिने उत्तर गोलार्धाचा भाग सूर्याच्या जास्त जवळ जात असतो. त्यामुळे त्याकाळात दिवस मोठा आणि रात्र छोटी होताना दिसते. याला “उत्तरायण” म्हणतात. पण हेच जेव्हा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ असतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस छोटा आणि रात्र मोठी होते. याला दक्षिणायन म्हणतात.

२२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला जातो. या तारखेपासून उत्तरायण सुरू होते. काळोख कमी होऊन उजेड वाढत जातो. असे म्हणतात की सुमारे 2000 हजार वर्षांपूर्वी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की, उत्तरायण सुरू होत असे. उत्तरायण सुरू झाल्याचा आनंद म्हणून मकरसंक्रांत सणाच्या रुपात साजरी केली जात असे. हे उत्तरायण सुरू होते तेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धात 23 1/2 अंशांवर तळपत असतो. म्हणूनच विषुववृत्तापासून 23 1/2 अंशांवर असणाऱ्या अक्षवृत्तास मकरवृत्त हे नाव पडले. ऋतु बदलू लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होत असते. हिवाळ्यात मिळेल ती उष्णता जास्त प्रमाणात शोषून ऊर्जा मिळवण्यासाठी गडद रंगांचा वापर केला जातो. काळया रंगाचा हा उपयोग तर सर्वश्रुत आहेच. पण इथून पुढे त्याची आवश्यकता नसते. हे दर्शवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आणि पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने अंधराकडून उजेडाचे प्रतीक म्हणून वापरले जातात.


गौरी : वा आजी किती छान माहिती दिलीस. आजी मोठ्या रात्री कडून मोठ्या दिवसाकडे जाताना वाटेत लागणारी पहाट कोण माहीत आहे का ?

माई आजी : अरे वा गौरी, सांग बरं ती पहाट म्हणजे काय ?

गौरी : धुंधुरमास !
आजी हा हा कुठला मराठी महिना नाही तर धुंधुरमास म्हणजे सूर्य धनू राशीत असतो तो काळ. रात्र आणि दिवसाच्या मधली पहाट! म्हणूनच तर या महिन्यात पहाटे लवकर उठून शेकोटीची ऊब घेतात, हुरडा खातात, तीळ लावलेली भाकरी, गूळ खाऊन शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. भोगीचा सण म्हणजे धुंधुरमास चा शेवटचा दिवस ! बरोबर की नाई ?

माई आजी : वा गौरी, किती सुरेख वर्णन केलेस ! चल मग ही भौगोलिक माहिती सणाच्या रुपात पुढच्या पिढी कडे सोपवणाऱ्या आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगू आणि साजरी करू मकरसंक्रांत !

© सौ रश्मी साठे उन्हाळे.
परंपरा मंच

वास्तूशांतीचा मुहूर्त मिळत नाहीये? हे आहेत उपाय…

वास्तुशांती चा मुहूर्त नाही? नवीन घरी राहायला जाता येत नाही? ह्याला उपाय आहे!

काही वेळा नवीन घर बांधून होते किंवा नवीन घर घेतलेलं असतं पण वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. कधी तरी घरमालकांचा तगादा असतो किंवा नवीन घरात रहायची ओढ, अशी बरीच कारणे असतात. मग अश्या वेळेस मुहूर्त नसल्यास काय करावे? अहो घाबरू नका, ह्याला उपाय आहे.

वास्तुशांती केल्याखेरीज नव्या घरात राहण्यास जाऊ नये असे नाही. अश्या वेळेस उदकशांती अथवा ग्रहयज्ञ करून गृहप्रवेश करावे. तत्पूर्वी ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घेऊन त्यादिवशी हळदकुंकू, पाण्याने भरलेला तांब्या,थोडे तांदूळ, हार, पेढे व देवाचा फोटो प्रथम उभयतांनीं नव्या घरात नेऊन ठेवावे. देवाचे फोटो हार घालून,पेढयाचा नैवेद्य समर्पण करून नमस्कार करावा. नंतर पती आणि पत्नीने पेढा खाऊन पाणी प्यावे. ह्या धार्मिक कृत्यानंतर नंतर घरी राहावयास जावे व नंतर मुहूर्त मिळाला कि वास्तुशांती करावी. घरातील सर्व मंडळींसह मंगलकलश, दीप व देव घेऊन ब्राम्हणांनी मंत्रपठण करत गृहप्रवेश करावा. हे करणे आवश्यक आहे.

बस झालं  तर मग, आता नवीन घराचा आनंद घेण्यास तुम्ही मोकळे!


गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand