तुळसी विवाह | तुळशीचे लग्न | तुलसी विवाह

तुळसी विवाह
महत्व :
विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा हा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, तुळस ही लक्ष्मी चे रूप मानले जाते. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते.

शास्त्रीय कारण:
मानवी जीवनात तुळशीचे खूप महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे नाश करते.
तुळस मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

ह्या दिवशी तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करून तसेच सर्व सौभाग्य अलंकार चढवतात.बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात.
वेगवेगळ्या विभागप्रमाणे तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे.

विधी व पूजा:
१.आचमन करून संकल्प केला जातो.
२.षोडशोपचारे गणपती पूजन केले जाते.
३.तुळशीची व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.
४.तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करतात.
५.त्यानंतर बाळकृष्ण व तुळस यांच्या मध्यभागी अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात.
६. महानेवेद्य व आरती करून मंत्रपुष्पांजली केली जाते.

तुळशीला आणि बालकृष्णला गोडाचा नैवेद्य व फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात.
ह्या दिवशी दीप उत्सव करून फटाके उडवून मोठया आनंदाने उत्सव साजरा करतात.

विधीयुक्त षोडशोपचारे तुलसी पूजन करण्यासाठी गुरूजी ऑन डिमांड च्या संकेत स्थळाला भेट द्या आणि तुलसी विवाह ची वेळ आजच नोंदवा.

तुलसीमातेची आरती:

जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

#गौरीपूजन: शास्त्र काय सांगते ?

भाद्रपद महिन्यात अनेकांकडे परंपरेनुसार गौरीपुजन केले जाते. या गौरी काहिजणांकडे धातुच्या किंवा मातीच्या स्वरुपात उभ्या तर काहींकडे तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. ज्याच्याकडे पिढ्यानपिढ्या जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे. त्यात बदल करु नये.

गौरी आवाहन मुहूर्त
भाद्रपद महिन्यातील गौरी बसवताना / आवाहन करताना त्या नेहमी “अनुराधा” नक्षत्रावर बसविल्या / पुजल्या जातात. अशावेळी वैधृती भद्रा विष्टी राहुकाळ इ.कुयोगांचा दोष नसतो. अनुराधा नक्षत्र असेपर्यंत गौरी बसवल्या जातात. उदा. गौरीआवाहनाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र जर रात्रीपर्यंत असेल तर संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी बसवल्या जातात. यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी रात्री १०.५६ पर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने संपूर्ण दिवसभरात कधीही गौरी आवाहन करावे.
गौरी आवाहनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन होते.म्हणजे बोली भाषेत “गौरी जेवतात”. यादिवशी कुलाचाराप्रमाणे पुजन करुन सवाष्ण जेऊ घालतात.

गौरी विसर्जन
गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरच होते. यासाठीही विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी मूळ नक्षत्र रात्री ८ वा. ५ मि. पर्यंत असल्याने रात्री ८ पर्यंत केव्हाही गौरी विसर्जन करावे
संदर्भग्रंथ – दाते पंचांग व निर्णयसिंधु

होळी चे पौराणिक महत्व आणि कृषी विषयी महत्व

होळी.
पौराणिक महत्व- लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे.

कृषी संस्कृतीतील महत्व-
शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
www.gurujiondemand.com

श्री महादेव रूद्राभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती.

कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवाला अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये शिंपडावे.

रुद्राभिषेकाचे महत्व

रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.

श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:

१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः” असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

२] अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात.

एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]

सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]

त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.

या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

अभिषेक :

अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.

श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक.

रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने.
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने.
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने.
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१ आवर्तने

©️ Guruji On Demand

अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाणारे कोजागिरी पौर्णिमा व्रत…

अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा केली जाते.

अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ ही येणाऱ्या
30 ऑक्टोबर 2020 रोजी येत आहे.
कोजागिरी उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ ह्या वेळेमध्ये केला जातो.
इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची मनोभावे पूजा केली जाते.

kojagiri pornima vrat

https://gurujiondemand.com/

ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते , बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.

चंद्राची किरणे पडलेले दूध आरोग्यासाठी खूप उपायकारक असते असे मानले जाते।ल.

  • पूजाविधी मांडणी :-

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्यात आंब्याचा डहाला घ्यावा.
अशी मांडणी मुहूर्ताच्या आधी करून ठेवावी. दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे.

४) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुधामध्ये एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा

शक्य झाल्यास गायत्री मंत्राचे पठाण करावे. तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा वाचावा.
दुधाचा नैवेद्य उपस्थित व्यक्तींनी घ्यावा.

लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर ह्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक मनोभावे पूजा करतात.

©️ Guruji On Demand

ग्रहणकाळात फलप्राप्तीसाठी करा या मंत्रांचा जप…

मंत्रोपदेश घ्यावयाचा तो फक्त सूर्यग्रहणातच घ्यावा त्यानंतर प्रत्येक सूर्य-चंद्र ग्रहणात त्या मंत्राचे पुरश्चरण करावे म्हणजे मंत्राला मालिन्य व शिळेपणश येत नाही. गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र नवग्रहांचे मंत्र त्या त्या देवतेच्या सख्येइतक्या वेळा म्हणजे अथर्वशीर्ष २१ वेळा श्रीसूक्त १६ वेळा याप्रमाणे म्हणावे.

ग्रहणाचा पुण्यकाल कमी वेळ असेल तर ही संख्या कमी करावी कारण पुण्यकालातच हे सर्व करावयाचे आहे सौरसूक्त मात्र दोनही ग्रहणात म्हणू नये.

स्त्रियांनी पुण्यकालात स्तोत्र पाठ (महिम्न, व्यंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्त्रनाम, गणेश, देवी सहस्त्रनाम) व नामजप करावा उदा – श्रीराम जयराम जय जय राम.. रघुपति राघव राजा राम… नमो भगवते वासुदेवाय …नमो भगवते गजाननाय…

ग्रहण स्पर्श व मोक्षस्नाने पुरुषानी डोक्यावरून करावी सुवासिनी स्त्रियानी मात्र गळ्याखालील करावी.

दर्भ ठेवलेली वस्तू बिघडत नाही हे आता विज्ञानानी सिद्ध झाले आहे दर्भ ठेवलेली वस्तू अपवित्र होत नाही म्हणून लोणची इत्यादि पदार्थावर दर्भ ठेवण्याची प्राचीन पद्धति आहे दर्भ ठेवलेले वस्त्र ग्रहणानंतर घेण्यास हरकत नाहीज्या कपड्याना ग्रहण काळात आपण शिवलो नाही, त्या वस्तू विटाळत नाहीत .

संदर्भ- धर्मशास्त्रीय निर्णय, दाते पंचांग.

गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand