होळी चे पौराणिक महत्व आणि कृषी विषयी महत्व

होळी.
पौराणिक महत्व- लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे.

कृषी संस्कृतीतील महत्व-
शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
www.gurujiondemand.com

पौर्णिमा 12 तारखेला , मात्र दत्तजयंतीची पुजा करा 11 तारखेलाच…..

मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस म्हणजे दत्तजयंती हा प्रत्येक दत्तभक्तासाठी अपुर्व सोहळा असतो. मात्र यावर्षी कॅलेंडरमध्ये दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी पौर्णिमा दिली असुनही आदल्या दिवशी म्हणजे दि. ११ रोजी ‘दत्तजयंती’ साजरी करावी अस सांगितलय. तर हे कस ?? असा प्रश्न सामान्य जनांस पडतो.


याच कारण “धर्मसिंधु” ग्रंथात असे आहे कि ज्या दिवशी “प्रदोषव्यापिनी” म्हणजे सायंकाळचे वेळी सर्वात जास्त काळ पौर्णिमा आहे असा दिवस दत्तजयंती म्हणुन साजरा करावा. याशिवाय “निर्णयसिंधु” ग्रंथ असे सांगतो कि अठरा घटिका पेक्षा कमी म्हणजे सर्वसाधारण ७ तास १२ मिनिटापेक्षा कमी वेळ चतुर्दशी असुन नंतर पौर्णिमा असेल तो दिवस पौर्णिमेच्या कोणत्याहि व्रतास योग्य व इष्ट समजावा. म्हणजेच दि. ११ रोजी सकाळी १०:५९ वा. चतुर्दशी संपुन पौर्णिमा सुरु होते व ती दि. १२ डिसेंबर रोजी स. १०:४२ पर्यंत आहे. म्हणुन दि. ११ चा दिवस सर्वप्रकारच्या दत्तजन्मासाठी म्हणजे दुपारी १२ वा. आणि सायंकाळी ६ वाजता साजर्‍या होणार्‍या दत्तजयंतीसाठी इष्ट समजावा.
याचाच अर्थ यावर्षी दि. ११ डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी. अभिषेक, याग, अन्नदान (फराळ) यासाठी दि. ११ चाच दिवस इष्ट समजावा.


दत्तजंयतीसाठी गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि दत्तयागासाठी परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच मागवण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
https://gurujiondemand.com/catalogue/datta-jayanti-pujan_109/


संदर्भ- धर्मसिंधु, निर्णयसिंधु, दाते पंचांग.

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand