ग्रहांची शांत करणे आवश्यक आहे का?

पृथ्वी पासून ग्रह कितीतरी दूर आहेत. अशा ग्रहाचा पृथ्वीवर किंवा मानवावर परिणाम होत नाही, अशी अनेकांची समजूत आहे. पण ती बरोबर नाही. कारण जी घटक द्रव्ये माणसात आहेत तीच घटक द्रव्ये ग्रहात आहेत. हि घटक द्रव्ये माणसात अल्पप्रमाणात आहेत तर ग्रहांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या घटक द्रव्यांच्या ग्रहांचा परिणाम अल्पप्रमाणात असलेल्या घटकद्रव्याच्या माणसावर होणे स्वाभाविक आहे. हे सर्व योगमार्गाने जाणून ऋषीमुनींनी याचे शास्त्र तयार केले. ते ज्योतिष शास्त्र. याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. १) ग्रहांचे पृथ्वीवर होणारे परिणाम,  २) ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम.

परिणाम अनुकूल वा प्रतिकूल असतात. असे परिणाम सर्व ग्रहांचे असतात. त्यात गुरु व शनी ग्रहांचे परिणाम जास्त दिसतात. जसे शनी ची साडेसाती. साडेसातीच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनेकांना याचा अनुभव येतो. अशावेळी शनी ग्रहाची शांति, जप, दान, होम, इ. प्रकरणी केली असता त्रास कमी होतो हे शास्त्र सांगते व तास अनुभव हि आहे. यालाच उपासना किंवा शांति असे म्हणतात. प्रतिकूल काळ असल्यास प्रतिकूलता कमी होते तर अनुकूल काळ असल्यास अनुकूलता वाढते. उपासनेचा उपयोग दोन्ही वेळेस होतो. लग्न वा मुंजी च्या वेळी सर्व ग्रहांची अनुकूलता असावी म्हणून तत्पूर्वी ग्रहयज्ञ करण्याची परंपरा आहे. ग्रहांची प्रतिकूलता व त्यामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होणे याकरिता सहनती करणे आवश्यक आहे.

उपनयन संस्कार

सगळ्यांना माहित असलेला उपनयन संस्कार. पहिला जन्म आई वडिलांपासून होतो आणि उपनयनात गायत्रीचा उपदेश करणारे आचार्य म्हणजे पिता व गायत्री हि माता यांच्या पासून दुसरा जन्म होतो. या उपनयनाला व्रतबंध असे म्हणतात. ब्रह्मचर्य व्रताचे ग्रहण करावयाचे असते म्हणून व्रतबंध म्हणतात. मुंज या वनस्पतीपासून दोरी तयार करवुन ती कंबरेला बांधली जाते म्हणून मौजीबंधन म्हणतात. हा उपनयन संस्कार म्हणजे दुसरा जन्म आहे. पहिला जन्म जरी आपल्या हाती फारसा नसला तरी दुसरा जन्म आपल्या हाती नक्कीच आहे. हा दुसरा जन्म योग्य वेळी व योग्य मुहूर्तावर व्हावा या करीत शास्त्रकारांनी काही बंधने घातली आहेत. उपनयन म्हणजे वेदांचा आरंभ असल्याने वेदाध्ययनाकरिता ज्या तिथी वर्ज्य करावयास सांगितल्या आहेत, त्या तिथी उपनयनाकरिता वर्ज्य सांगितल्या आहेत. तसेच उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस असतो. म्हणून उत्तरायण असताना मुंज करावी. मुहूर्त शास्त्राप्रमाणे इतरही गोष्टी उपनयनासाठी पहिल्या जातात. आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये प्रधान कर्म कोणते हे सांगितलेले असते. जसे संध्ये मध्ये अर्ध्यप्रधान हे प्रधानक्रम आहे तसे उपनयनामध्ये गायत्री उपदेश करणे हे प्रधानक्रम आहे. हा गायत्रीचा उपदेश देण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरिता जो उपदेश देणारा आहे त्याने गायत्रीचा १२ हजार जप करावा. बटूने सुद्धा काही प्रायश्चित घेऊन मग हा गायत्रीमंत्र ग्रहण करावा.

विवाह संस्कार

स्त्री व पुरुष दोघांनाही कामेच्छा असते आणि धर्म नियंत्रित केलेले काम म्हणजे विवाह संस्कार होय. विवाह संस्कारामुळे श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम प्राप्त होतो. तिन्ही आश्रम या  गृहस्थश्रमावर आधारित आहेत. म्हणून गृहस्थश्रम स्वीकारण्याची जी विवाह पद्धती आपल्याकडे सांगितली आहे, ती अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. देव, अग्नी आणि विद्वान ब्राह्मण यांच्या साक्षीने त्या दोघांनी विवाह बद्ध व्हावयाचे आहे. या या विवाह पद्धतीमध्ये हुंड्यासारख्या पद्धती बंद केल्या पाहिजेत         

असा हा विवाह संस्कार करताना कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, तर प्रथम कुळाची चौकशी करावी, कन्या देऊन मग कुळाची चौकशी करू नये, असे ज्ञानदेवांनी म्हंटले आहे. बुद्धिवान पुरुषाला कन्या द्यावी. वधू कशी असावी तर बुद्धिवान, रूपवान, शीलवान व निरोगी असावी, तसेच वरा पेक्षा वधू वयाने लहान असावी व जवळच्या नात्यातली नसावी. म्हणजेच मामे,आत्ये,मावस भावंडांमध्ये विवाह करू नका. असे डॉक्टर सुद्धा सांगतात. तसेच सगोत्र विवाह करू नये. तसेच स्वजातीयांमध्ये विवाह व्हावा. पत्रिका पाहून विवाह करावा विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत ते असे,  १) ब्राह्म  २) दैव  ३) प्रजापत्य  ४) आर्ष  ५) गांधर्व  ६) असुर  ७) पैशाच  ८) राक्षस.          कन्यादान करणे हा महत्वाचा विधी आहे. हे कन्यादान केल्याने मागील १२ पिढ्या व पुढील १२ पिढ्या पवित्र व्हाव्यात, असा संकल्प आहे आणि नारायण स्वरूप अशा वराला हि लक्ष्मीस्वरूप कन्या मी देत आहे अशी उदात्त भावना या विधीमध्ये आहे, तसेच धर्म – अर्थ – काम या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीकरिता हि कन्या देत आहे, असे वराला सांगितले जाते .